नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गार काढले. तसेच नीरजचा भव्य सत्कार महाराष्ट्रात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे कौतुक खास शब्दांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटले की, “मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो.” ठाकरे यांनी यावेळी नीरजच्या कामगिरीचे कौतुक तर केलेच, पण त्याचा भव्य सत्कार महाराष्ट्रात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईत त्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
नीरज चोप्रा हा १३ ऑगस्टला आपल्या हरयाणातील खांदरा या गावात येणार आहे. यावेळी नीरजचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नीरज १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सत्कार करु इच्छित आहे, असे ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांना सांगितले आहे.