
मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गाचे काम १२ वर्षांनंतरही अपूर्ण असून, लोणेरे ते दासगाव दरम्यानचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे आणि भेगा पडल्या असून, ही बाब ८ एप्रिल, २०२६ च्या सुमारास निदर्शनास आल्याचे नमूद करत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला होता.
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोणेरे ते दासगाव हे काम विभागाच्या अखत्यारितील पॅकेज क्र. २ मध्ये येते आणि हे काम २०२२ मध्येच पूर्ण झाले आहे. या कामाचा ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period) असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत नियुक्त स्वतंत्र अभियंत्याच्या देखरेखीखाली कंत्राटदाराकडून देखभालीची आणि दुरुस्तीची कामे केली जात आहेत.
















