बोदवड(प्रतिनिधी) : बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ग्रो ग्रीन क्लब अंतर्गत पावसाळी रानभाजी महोत्सव शुक्रवार 2 रोजी आयोजित करण्यात आला.महोत्सवाचे उदघाटन जामनेर येथील रस्सा भाकर हॉटेलचे संचालक संकेत पाटील यांनी केले. रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करतात तसेच नैसर्गिक वातावरणात उगवलेल्या रानभाज्या अनेक विकारांवर उपयुक्त आहेत.
घरच्या मसाल्यांचा वापर करून केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात असे उदघाटक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रमुख पाहुण्या जामनेर महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मंदा पाटील या होत्या. त्यांनी रानभाज्या सेवन हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे असे सांगत त्याचा वापर आपण अवश्य करायला हवा असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी रानभाज्याची ओळख व त्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे याची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी अश्या महोत्सवाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात परिसरातील रानभाज्या यांची ओळख ,त्यांचे गुणधर्मामुळे त्यांचे उपयोग व दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचे संवर्धन होण्यासाठी जागृती हा उद्देश महोत्सवाचा असल्याचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ गीता पाटील यांनी नमूद केले.
महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .यावेळी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कुरडू, मायाळू, घोळ, कटूरले, अंबाडी, लाल माठ, तांदुळजा, केना,फांग, अळू, शेवगा, इत्यादी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृती सादर केल्या.या वेळी उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी, नारायण अकॅडमीचे संचालक प्रा. अमरीश चौधरी, प्राध्यापक प्रभाकर महाले. डॉ. अजय पाटील. हेमलता कोटेचा, डॉ. ईश्वर म्हसलेकर, प्रा. नितेश सावदेकर ,डॉ. रुपेश मोरे,डॉ. अनिल बारी, यांच्यासह महोत्सवास भेट देणाऱ्यांनी पाककृतींची चव घेतली.बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण प्राध्यापक मंदा पाटील,श्री. संकेत पाटील व डॉ. रत्ना जवरास यांनी केले.प्रथम क्रमांक कु.ऐश्वर्या शेळके हिने तर द्वितीय क्रमांक कु. करिष्मा तेली व गोपाल तेली ह्यांनी आणि कु. कोमल लोहार व प्रीती पाटील ह्यांनी तृतीय क्रमांक पटकावला .प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वंदना नांदवे यांनी केले तर आभार .संदीप बरडे यांनी मानले.महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ,कार्यालय अधिक्षक बाबुराव हिवराळे ,श्री. शेखार्सिंग चव्हाण, डॉ. मनोज निकाळजे ,डॉ. चेतन शर्मा, श्री. नरेंद्र जोशी, डॉ. रुपाली तायडे, कंचन दमाडे, वैशाली अहिरे, संदीप बर्डे,भूषण धनजे, समीर पाटील, जितेंद्र बडगुजर विजू धोबी ,अतुल पाटील, दीपक जोशी , नामदेव बडगुजर , वैभव माटे , ज्ञानेश्वर बाविस्कर , राम पाटील , अक्षय सुकाळे ,पवन गावंडे या सर्वांनी परिश्रम घेतले.