जळगाव (प्रतिनिधी) येथील रामेश्वर कॉलनीत असलेल्या तुळजाई नगरात एका महिलेचा चेहऱ्यावर जबरी हल्ला करत तिचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीये. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तुळजाई नगरात राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर काहीतरी वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. वंदना गोरख पाटील (वय-४२) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होती. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु आहे.