कोल्हापूर (वृत्तसंस्था) माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री हा उपक्रम कोल्हापूर शहरात सुरु आहे. मास्क नसलेल्या नागरीकांना महानगरपालिकेच्यावतीने आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कोल्हापुरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांचे गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे.
तसेच विविध व्यापारी असोशिएशनच्या सहकार्याने मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवाय यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री ही मोहिम गतीमान केली आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा यासाठी सर्वदूर जनजागृती मोठ्या प्रमाणात होत असतानाही काही नागरीकांनी कोरोना संसर्गाचे गांभिर्य घेतलेले दिसत नाही, उलट कित्तेक नागरिक विनामास्क रस्त्यावरुन फिरताना आढळतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स, महाव्दाररोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ अशा शहरातील विविध व्यापारी असोसिएशन आणि संघटनांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर आज दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पद्धतीने मास्क आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या गांधीगिरीमुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा आयुक्त नितिन देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.