भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ येथे एका प्रेमी युगलाने लग्नाआधीच किरकोळ वादातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शनिवार रोजी घडली. भुसावळ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहुल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव (वय २३) याने काजल गौतम सपकाळे (वय २०) या तरुणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकाच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता, लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते. परंतू शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केले. यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.
काजलच्या निधनाची वार्ता येताच कुणाल मनोज भालेराव याने देखील थेट तापी नदीच्या पुलावरून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीस त्याचा मृतदेह नदीपात्रातून वाहेर काढण्यात आला. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता, दोघेही विवाहबद्ध होणार होते. परंतू तत्पूर्वीच प्रेमी युगलाचा करूण अंत झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.