पुणे (वृत्तसंस्था) नाथाभाऊ भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण नाथाभाऊ कुठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. भाजपाचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणे, पुन्हा सामान्य होणे ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणे सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. खडसे नाराज असल्याने कार्यक्रमांना अनुपस्थित असतात असे विचारण्यात आले असता प्रदेश कार्यकारिणीला ते दिवसभर उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच गेले अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. दरम्यान, येत्या २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.