मुंबई प्रतिनिधी । एमएसआरएलएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची पुर्नियुक्ती थांबविण्याच्या निर्णयाविरोधात दि.30/09/2020 पासून सनदशीर मार्गाने असहकार आंदोलन करण्यात येत आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमेद महाराष्ट्र राज्य प्रामीण जीवनोन्नती अभियान सन 2011 पासून उद्यास आले असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाचे काम हे अभियान करत आहे. आज रोजी महाराष्ट्र राज्यातील सुमारे पन्नास लाख कुंटुंब 4,78,488 समुहाच्या माध्यमातुन अभियानाशी जोडली गेली आहेत. अद्यापही सन 2011 च्या जनगननेनुसार बरीच कुटुंबे सामाजिक समावेशन करण्याची प्रक्रिया या अभियानातील सर्व कर्मचारी स्वतःला झोकुन समर्पित भावनेने आपली संपुर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. असे असताना सुध्दा उमेद अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणारे कर्मचा-यांना अचानक दि.10/09/2020 च्या पत्रान्वये पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सद्यस्थितीत राज्यभरातील 500 हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणांत संपुष्टात आली असून उर्वरीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबतही नजीकच्या काळात हीच वेळ येण्याची शक्यता आहे. उमेद एमएसआरएलएम अंतर्गत ग्रामीण भागातील गरिबातील गरीब कुटुंबाना स्वंयसहाय्यता समुहांच्या माध्यमातुन संघटीत करण्याचे काम सुरू असून स्वंय सहाय्यता समुह, ग्रामसंघ यप्रभागसंघ अशी त्रिस्तरीय संस्थीय बांधणी करून या संस्थाच्या माध्यमातुन लक्ष घटकांना, कुंटुंबाना सामाजिक-आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम सन 2011 पासून सुरू आहे. उमेद एमएसआरएलएम, प्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 10/09/2020 रोजीच्या आदेशानुसार अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचेयावत घेतलेला निर्णय हा सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा आता तात्काळ व नजीकच्या काळात खंडीत करणारा आहे. सदर निर्णय जसा यामागील 8 वर्षापासून कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तीक, कौटुंबीक, आर्थिक सामाजिक व एकुण भविष्यातील वाटचालीवर विपरीत परिणाम करणारा आहे. तसेच, तो गरीयांच्या उभ्या राहिलेल्या समुदाय स्तरीय संस्था म्हणजेच समुह ग्रामसंघ, प्रभागसंघ, उत्पादक गट, कृषी उत्पादक कंपनी व One Stop Facility Center या सर्व संस्थाच्या प्रगतीच्या आड येणारा आहे.
सद्यस्थितीत उभे राहिलेले काम उमेद एमएसआरएलएम मध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यंत्रणेच्या अनुपस्थीतीत पुढे कसे जाणार हा प्रश्न उद्भवत असून याथावतीत काय परिस्थिती निर्माण होईल हा खप चिंतेचा विषय आहे. याविषयामध्ये संस्थाना आवश्यक ते सुलभीकरण करणे आवश्यक असून त्यासाठी या संस्थासोबत काम करणारी उमेद अभियानाची अधिकारी व कर्मचारी यंत्रणा सोबत असणे गरजेचे आहे. ज्या संस्था या अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विविध अंगी समस्यांना सामोरे जाऊन अथक प्रयत्नांतुन उभारल्या त्या संस्थांना आज या स्थितीत वा-यांवर सोडून त्यांच अधिकारी कर्मचारी यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखविणे हे जितके संयोधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अन्याय कारक आहे. तितकेच ते या सर्व समुदाय स्तरीय संस्थाचा हिताच्या आड येणारे आहे. सद्यस्थितीत अभियानामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यंत्रणेबाबत उमेद एमएमआरएलएम ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अबलविलेले धोरण पाहता उमेद अभियानाचे मागील आठ वर्षाहून अधिक काळ उभे राहिलेले काम अभियानाचा मुळ उद्देश पुर्ण होण्याच्या अगोदरच ठप्प होण्याचे दाट संकेत देणारे आहे. मागील सहा महिन्याहून अधिक काळ कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबानी आपले रोजगार गमावलेले असताना उमेद एमएसआरएलएम मधुन उभी राहिलेली आर्थिक विकासाची चळवळ या कुट्थाना आधार देत आली आहे. परंतु, आता मात्र ही चळवळ उभा करणा-या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा संपुष्टात आली असून त्यांच्या स्वत:च्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा हा निर्णय अभियानामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता अन्यायकारक तर आहेच, परंतु सोबतच ग्रामीण भागातील कंट्याचे जीवनमान सुधारण्यासाठी उभी राहिलेली स्वंयपहाध्यता समुहाची चळवळ थांबवुन गरीब, गरजू कुंटुंबाना पुन्हा आर्थिक व सामाजीक दृष्टया मागे नेणारा आहे. शासन स्तरावरून यावर विचार होणे आवश्यक असून तसे न झाल्यास उमेद अभियानातून गरीबी निर्मुलनासाठी उभे राहिलेले काम ढेपाळून पुढील कामाची वाटचाल रोखली जाणार आहे. यानुसार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय अन्यायकारक असून याबाबत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याच्या अनुषंगाने बुधवार दि.30/09/2020 पासून आम्ही सर्व अधिकारीव कर्मचारी यांना सनदशीर मार्गाने बेमुदत असहकार आंदोलन सुरू रावयाचे आहे. सदर असहकार आंदोलनामागील प्रमुख कारणे मागण्या पुढील प्रमाणे :-
1.दि.10/09/2020 रोजीचा अधिकारी व कर्मचारी यांना पुननियुक्ती न देण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद काम या निर्णयामुळे मादीत झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना तात्कार पुननियुशी देण्यात यावी.
2. यापुढील काळात उमेद एमएसआरएलएम मुळा मनुष्याचा संसाधन धोरणानुसारच सर्व कर्मचायांची अभियानातील पदभरती कायम ठेवण्यात यावी.
3. उमेद अभियाना अंतर्गत समितीत आपरत अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती, पूर्वनियुली,पदभरती व एकृष्ण व्यवस्थापन कोणत्याही परिस्थितीत उपस्त यंत्रणेकडून करण्यात येऊ नये.
वरील तीन प्रमुख मागण्या मान्य होऊन आमहाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी आमच्यावर होणा-या अन्यायाबाबत सनदशीर मार्गाने बेमुदत असरकार आंदोलन करणार असून सदर बाब आपले माहितीस्तव या निवेदनाव्दारे सादर करीत आहोत.