मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर भारतातील हवामानाच्या स्थितीमुळं राज्यात थंडीचं वातावरण आहे. मुंबई, (Mumbai) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट पसरलीय. मुंबईत पारा १९ अंशावर पोहोचला आहे. धुळ्याचा पारा घसरला तापमान २.८ सेल्सिअस वर पोहोचला आहे. धुळे शहर गारठले असून १० वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसून आहेत.
धुळ्यात कमी तापमानाची नोंद
धुळ्याचा पारा घसरला तापमान २.८ सेल्सिअस वर पोहोचला आहे. धुळे शहर गारठले असून १० वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसून आहेत. सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झालीय. धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तिचा परिणाम जनजीवनावर होत आसल्याने चित्र पाहण्यास मिळत आहे. अजून काही दिवस थंडीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे
नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम
नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी ४.६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झालीय. कुंदेवादी येथील गहु संशोधन केंद्रातील हवामान विभागात ही नोंद झालीय. अकोल्यात तापमानाचा पारा घसरला असून तापमान ९ अंश सेल्सियसवर गेलं आहे. कालचे तापमान १०.०६ अंश सेल्सियस होते .
नंदुरबारमध्येही थंडी कायम
सातपुड्याच्या डोंगराळ भागात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तापमान ४ अंशावर पोहोचलं आहे. तिचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे. थंडी पासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. त्याच प्रमाणे सपाटी भागात तापमान ८ अंशाच्या जवळपास असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.
मुंबईचा थंडीचा जोर कायम
मुंबईत थंडीचा जोर आजही कायम आहे, शहरातील तापमान १९ अंश सेल्सियस इतकं नोंद झालंय. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १७० वर पोहोचलाय. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी थंडीची लाट येणार आहे. तापमान ८ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.