TheClearNews.Com
Tuesday, December 16, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कांदा अनुदान मिळालेच पाहिजे; शिवराम पाटील यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात कांदाचे भाव कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता म्हणून महाराष्ट्र सरकारने २००रूपये प्रति क्विंटल अनुदान दिले. तसा जीआर पारीत केला. त्यानुसार एका कृषी उत्पन्न बाजार समीतीला त्रीस्तरीय समीती बनवली. ज्यात कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सचिव उमेश राठोड, ऑडिटर आर.डी.पाटील व सहाय्यक निबंधक जी एच पाटील यांची नियुक्ती केली. त्यामुळे आता कांदा अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी केली आहे.

सचिव राठोड यांनी एकूण ४५३१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव समीती समोर मांडले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून वैयक्तिक अर्ज घेण्याची गरज पडली नाही. शेतकरीकडे कांदा विक्री केल्याची पावती आहे. त्याची मुळ प्रत बाजार समीतीला आहे. ज्यांच्या कडे या कालावधीत कांदा विक्रीची पावती आहे, ते अनुदानास पात्र आहेत. पण या समीतीने ४५३१ पैकी एकाही शेतकरीला अनुदान पात्र ठरवले नाही. का? तसेच कारणाने अशी दिली.

READ ALSO

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

१) अर्ज १५-४-२०१९ नंतर आला. ही सबब चुकीची आहे. कारण, सचिवाने जी यादी सादर केली. ती तपासणी साठी ग्राह्य मानली तर १५-४-२०१९ नंतर अर्ज आला, अशी सबब चुकीची आहेच.

२) आडत्याने सौदा पावती व हिशेब पावतीची नोंद दाखवली नाही. नोंद क्रमवार नाही. ही सबब शेतकऱ्यांशी असंबद्ध आहे. कारण अशी नोंद ठेवणे शेतकऱ्यांची जबाबदारी नाही.

३) बाजार समीतीच्या गेटवर वाहन, ट्रेकर्स ची नोंद नाही. ही नोंद करणे बाजार समीती कर्मचारीची आहे. शेतकऱ्यांची नाही.

४) शेतकरीच्या सातबारा वर कांदा पीकपेरा लावला नाही. हे काम तलाठीचे आहे. शेतकरीचे नाही. यासाठी शेतकरीला अनुदानासाठी वंचित ठेवणे न्यायपुर्ण नाही. सातबारा वर पीकपेरा लावण्याची जबाबदारी शेतकरीची मानत असाल तर तसा आदेश द्या. म्हणजे शेतकरी ने लावलेला पीकपेरा ग्राह्य माना, म्हणजे तलाठीचे कामाचा बोझा कमी होईल. तलाठी रेतीचोरी ट्रेकर्स पकडायला मोकळा होईल.

५) तत्कालीन सभापती स्व. उदय वाघ यांनी खोट्या पावत्या बनवल्या. होते सबब आक्षेपार्ह आहे. तसे असेल तर सभापती व संचालक मंडळावर दप्तर मधील हेराफेरी चा गुन्हा नोंदवला पाहिजे. का नोंदवला नाही?

६)फक्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समीतीला ४५३१ विक्री पावती खोटी बनली असेल, एकही खरी नसेल तर, कशाला हवी कृषी उत्पन्न बाजार समीती? बरखास्त करा, बंद करा, जे मोदी सरकारने केले ते स्विकारा.

७) सेना, कांग्रेस, राष्ट्रवादीच्या आधिकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समीती खोटी, बोगस, भ्रष्ट असेल तर केंद्राने पारीत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करणे चुकीचे आहे. अनैतिक आहे.

८) महाराष्ट्रात कृषी मंत्री सेनेचे दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीचे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील राष्ट्रवादीचे, तरीही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समीती म्हणजे हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असेल, जेथे माल विकला तर विक्री पावती बोगस समजून शेतकऱ्यांना अनुदान नाकारले असेल तर या मंत्र्यांचा आणि आमदाराचा काय उपयोग? का निवडून दिले यांना? का मंत्री बनवले यांना?

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटलांना आम्ही हे निवेदन दिले. तेथे हजर आमदार अनिल पाटील, माजी आमदार सतीष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी तरी याची दखल घेतली पाहिजे. आमदार आणि मंत्री ला हा विषय कळत नसेल किंवा कळत असूनही वळत नसेल तर जयंत पाटलांचा दौरा कोणासाठी होता? त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय मतलब?, बैनरवर फोटो लावला नाही म्हणून जळगावच्या लेवाभवनमध्ये जयंत पाटलांसमोर एक तास वाद घालणाऱ्या नेत्यांनी शेतकरीच्या हितासाठी अर्धा तास तरी संवाद केला पाहिजे का नाही?, आम्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे, आमदारांकडे कांदा अनुदानाचा प्रश्न मांडलेला आहे. ज्याला कळला असेल त्यांनी मदत करावी. ज्याला कळला नसेल त्यांनी पुन्हा समजून घ्यावा. ज्यांना कळला असेल परंतु शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्याची मानसिकता नसेल त्यांनी जाहीर सांगावे कि,आम्ही शेतकरीला अनुदान मिळू देणार नाहीत.

केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्याआधी आपण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अनुदान वाचून जाणीवपूर्वक वंचित ठेवत आहोत का? याची पुन्हा खात्री करावी. कृषी उत्पन्न बाजार समीती भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असेल तर शेतकऱ्यांचे हित जोपासत नसेल तर, होऊ द्या बरखास्त!, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादा भुसे हे शेतकऱ्यांना न्याय देण्यास सहमत नाहीत किंवा सक्षम नाहीत. असे या उदाहरणावरून सिद्ध होत आहे. तसेच महाआघाडी सरकार कृषी उत्पन्न बाजार समीती चालवण्यास सक्षम नसेल किंवा पात्र नसेल तर कशाला हव्यात बाजार समीत्या?होऊ द्या बंद !, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

December 16, 2025
जळगाव

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 16, 2025
गुन्हे

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

December 16, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
गुन्हे

विटांच्या ट्रॅक्टरच्या नावाखाली ५० हजारांची लूट !

December 15, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
Next Post

गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

December 16, 2025

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

October 20, 2020

‘आंदोलनजीवीं’नी शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम केलं : पंतप्रधान मोदी

February 10, 2021

जळगावच्या जोशी कॉलनीत अवतरले गोकुळ !

December 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group