भुसावळ (प्रतिनिधी) एलटीटी म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयानगर दरम्यान धावणाऱ्या पवन एक्स्प्रेसला अपघात झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुंबईहून जयनगरकडे निघालेली डाऊन 11061 पवन एक्स्प्रेसचे चार डबे लहावीट-देवळाली दरम्यान घसरले असून या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत तर या अपघामुळे अप लाईनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भुसावळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच एआरटी टीम घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघातामुळे अनेक गाड्या खोळंबणार असून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
















