जळगाव (प्रतिनिधी) – आपल्या आक्रमक कार्यशैली, अष्टपैलू नेतृत्व आणि लोककल्याणकारी निर्णयाने जनतेच्या मनावर कायमचे अधिराज्य गाजवणारे ना. गुलाबराव पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अग्रगण्य नाव. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय शिवसेना पक्ष संघटनेतील त्यांचे भरीव योगदान, त्यामुळे गुलाबराव पाटील आज लोकनेता म्हणून ओळखले जातात.
ना. गुलाबराव पाटील यांच्या राजकीय कार्यपद्धतीतील सर्वात मोठा पैलू म्हणजे, त्यांचा अफाट जनसंपर्क, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते जेष्ठ नागरिक, युवक, शालेय विद्यार्थी या प्रत्येकाशी आत्मियतेने संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांनाच भावते. गावागावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणे, संकटसमयी धावून जाणे प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणे, बामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा निर्माण झाला आहे. राजकीय नेता आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करण्याचे कार्य त्यांनी आपल्या वर्तनातुन केले आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या व्यक्तीमत्वात राजकीय परीपक्तेसोबत मानवी संवेदनशीलतेचाही सुंदर मिलाप आहे. पद आणि सत्ता असतानाही सामान्य माणसाशी साधेपणाने वागण्याची त्यांची वृत्ती हिच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे गमक आहे. कार्यकत्यांना प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला संधी देणे आणि संघटन मजबूत ठेवण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात स्पष्टपणे जाणवते. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात संयमित भाषा, अभ्यासू भूमिका आणि लोकहिताचा दृष्टीकोन कायम ठेवणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विरोधी विचारांच्या लोकांशीही सुसंवाद ठेवत विकासाच्या मुद्यावर ठाम भूमिका घेण्याची त्यांची कार्यशैली अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आरोग्याची वारी आपल्या दारी
आरोग्य सेवा हा ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय. आर्थिक कारणांमुळे अनेकवेळा ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी महागड्या वैद्यकीय सेवा घेणे अवघड होते. आरोग्याचा हा कळीचा मुद्दा हेरुन ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात आरोग्याची वारी आपल्या दारी हा सामाजिक उपक्रम सुरू केला. या माध्यमातून नेत्र तपासणी करुन पनवेलच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केले जाते. रुग्णांना पाळधी ते पनवेल मोफत बस, जेवणाची व्यवस्था केली जाते. तसेच डॉक्टरांचे पथक व सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिकेतून प्रत्येक गावात नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधी वाटप करण्यात येते. आजपर्यंत हजारो रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम सुरू झाल्यापासून आजही अविरतपणे सुरु आहे.
मी पंढरीचा वारकरी
आषाढी एकादशीनिमित्त मतदार संघातील ३ हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जाणारी रेल्वे, ३ ते ४ दिवस भाविकांना पंढरपूरात रहाण्याची व जेवणाची व्यवस्था ना. गुलाबराव पाटलांचे सुपुत्र प्रतापराव पाटील करतात. सोहळ्यात सहभागी होऊन ते वारकऱ्यांसोबत भजन, कीर्तन भक्तीरसात न्हाऊन जातात. ना. गुलाबराव पाटील नुसते या विषयावर थांबले नाहीत, यापुढेही मतदार संघातील विद्याथ्यर्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप, दिव्यांगांना बाईक वाटप, भजनी मंडळांना साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्याचे सर्व शालेय शिक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे ते स्वीकारतात. शेतकऱ्यांचा जाणता राजा
ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांकडे सातत्याने त्यांनी लक्ष दिले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्व शेतरस्ते डांबरीकरण करण्यात भर दिला. अनेक गावांमध्ये रस्ते, पुल, पाणीपुरवठा योजना आणि वीज सुविधा उपलब्ध करून देत ग्रामीण विकासाला चालना दिली. शेतकरी देशाचा कणा आहे, या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला. पिकविमा, सिंचन, विजपुरवठा, बाजारभाव यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावीपणे पाठपुरावा केला.
ना. गुलाबराव पाटील यांचा राज्यातील पहिले वारकरी भवन जळगावात उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. ना. गुलाबराव पाटील म्हणजे लोकांविषयी असलेल्या तळमळीतून जागृत झालेले नेतृत्व, मनातील जिद्द आणि तडफदार नेतृत्व त्यांना या पदापर्यंत घेऊन गेले. एक साधा, मनाने सरळ असणारा पाळधीपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे आपल्या लोकांविषयी आस्था बाळगणारे, कलेवर प्रेम असणारे एकेदिवशी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन लोकसेवेसाठी भगव उपरणे गळ्यात घालून निष्ठावंत शिवसेनेचे कार्यकर्ते बनले. तर, सत्ता नव्हती तरी जनतेसाठी त्यांनी आपली आस्था तितक्याच तळमळीने टिकवून त्यांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व जनतेच्या गळ्यातला ताईत झाले, असे लोकनेते ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.















