नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिवळ्यात पेट्रोल, डिझेलची मागणी वाढते, त्यामुळे किंमतीत वाढतातच. मात्र आता हिवाळा संपत आल्याने इंधनाची मागणी कमी होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असा अजब दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
देशात काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर बोलणं म्हणजे धर्मसंकट अस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता पेट्रोलियच्या वाढत्या दरांसाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजब कारण दिले आहे. हिवाळ्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत होत्या. मात्र आता हिवाळा संपत आल्याने इंधनाची मागणी कमी होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. हिवाळा गेल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं, दर कमी होतील,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९० रुपये ९३ पैसे तर डिझेलचा दर ८१ रुपये ३१ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईत हा पेट्रोलचा दर ९७ रुपये ३४ पैसे आणि डिझेलचा दर ८८ रुपये ४४ पैशांवर पोहोचला आहे.
दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं. तसंच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही सांगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.