भुसावळ (प्रतिनिधी) सध्या कोरोना काळात नागरिकांना ऑक्सीजन कमतरता भासत असल्याने जीवन जगणे कठीण झाले असून रुग्णालयात ऑक्सिजन विकत घेऊन जगण्याची वेळ आली आहे. याला कारण शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे सुरू आहे. आज रोजी जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शहरातुन तरुण पिढीने भुसावळात प्रार्थनास्थळ व धार्मिक स्थळांवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण केले.
दरवर्षी शहरांमध्ये पर्यावरण दिनानिमित्त हजारो वृक्ष वृक्षांची लागवड केली जाते पण सांग ओपन आकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसांनी लागवड केलेली वृक्ष कोलमडून नष्ट होतात तर काही जिवंत वृक्ष पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास ठेकेदार कापत आहे. यामुळे संपूर्ण हरितक्रांती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे वृक्ष कापून व्यापारी संकुलने उभारली जात आहे.
भविष्यात ऑक्सीजन निर्मिती करणारे वृक्ष असणे हे गरजेचे आहे. यासाठी भुसावळ शहरातील तरुण पिढीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुढाकार घेऊन भुसावळ शहरातील प्रार्थना स्थळे व धार्मिक स्थळांवर ऑक्सिजन निर्माण करणारी ५-५ वृक्ष असे ६० वृक्षांची लागवड केली आहे. मराठी अलायन्स चर्च, सिद्धार्थ बुद्ध विहार, गुरुद्वारा, तापी नदी वरचे शमशान भूमि, खडका गावातील खान का मुस्लिम कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी भुसावळ पत्रकार संघाचे सचिव हबीब चव्हाण, मुख्तार मन्यार, मुस्तफा खाटीक, आबिद पिंजारी, रफिक मन्यार, इब्राहीम खान, अन्सार मन्यार, अल्ताफ पिंजारी, वसीम खान, रोशन पिंजारी आदींनी मुस्लिम युवा मुलांनी जागतिक परिवारा दिनानिमित्त केलं वृक्षरोपण.कोरोनाच्या काळात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शहरात प्रत्येक व्यक्तीने ऑक्सिजन निर्माण करणारे एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे जरुरी आहे.