TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती ; भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

जाणून... घ्‍या संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार असल्याची माहिती गृह विभागाच्या विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस सेवेत संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या गृह विभागात मागील दोन वर्षांत नवीन पदांची भरती झालेली नाही. २०१९ मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया तब्बल दीड वर्षे चालली. आता २०२० मध्ये घोषित झालेल्या पदभरतीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली. दुसरीकडे पोलिस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना पोलिस हवालदारपदी नियुक्ती करताना तेवढ्या जागा रिक्त नाहीत. त्यामुळे अजून अनेकजणांना त्याच पदावर काम करावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. पण, आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असा विश्‍वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी, पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा त्यात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार आहे.

  • पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी
  • राज्याच्या गृह विभागात तब्बल ४९ हजार ५०० पदे रिक्त
  • पहिल्या टप्प्यात २०२० मधील सात हजार २३१ पदांची होणार भरती
  • पुढील टप्प्यात २०२१ व २०२२ मधील रिक्तपदांची एकत्रित होणार भरती
  • पोलिस नाईक झालेले होणार हवालदार; गृह विभागाने रद्द केले नाईक पद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

विधानपरिषद निवडणूक : शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! पुण्यात ९ बँकांची तब्बल एक कोटींची फसवणूक !

February 8, 2022

जून महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

June 9, 2021

अंजनी नदीवरून तीन कोटींची पाणी पुरवठा योजना : पालकमंत्र्यांची घोषणा !

December 18, 2021

बोदवडच्या न.ह.रांका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश !

June 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group