मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणूक (Investment) बाजारात असे अनेक पर्याय आहेत, ज्यात जोखीम न घेता चांगला नफा (Profit) मिळवता येतो. जर तुम्ही देखील कमी जोखमीचा नफा किंवा गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांबद्दल माहिती असायलाच हवी. यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह जास्त नफा कमवू शकता. भारतीय डाक (Indian Post)ची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक पर्याय आहे, ज्यामध्ये कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवता येतो.
३५ लाख रुपये मिळतील
आम्ही पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेबद्दल याठिकाणी सांगणार आहोत, इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही सरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चागला परतावा मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला आगामी काळात ३१ ते ३५ लाखांचा फायदा होईल.
हे आहेत गुंतवणुकीचे नियम
१९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजने अंतर्गत किमान विमा रक्कम १०,००० ते १० लाख रुपये असू शकते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांची सूट मिळते. या योजनेवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना घेतल्यानंतर तुम्ही ३ वर्षांनी ते सटेंडर देखील करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.
इतका होईल फायदा
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या १३ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा ५५ वर्षांसाठी मासिक प्रीमियम १५१५ रुपये, ५८ वर्षासाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४१ रुपये असेल. अशा परिस्थितीत पॉलिसी खरेदीदाराला ५५ वर्षानंतर ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपये आणि ६० वर्षासाठी ३४.६० लाख रूपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.