रावेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावंडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निर्घुण घटना आज घडली. या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार पोलिस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलिस दलाचे तीन पथक तयार केले होते. त्यानुसार रात्री उशिरा पाच संशयित आरोपी त्यांना अटक केली असून त्यातील ठिकाण तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली.
दरम्यान मे त्यांच्या कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
रावेर शहरालगत बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रूबेला रुंमली बाई बिलाला हे दांपत्य राहतात ते आपल्या मूळगावी मध्यप्रदेशातील गडी जिल्हा येथे नातेवाईकांच्या दशविध क्रिया साठी गेले होते घरात साईता वय 13 वर्ष रावल वय अकरा वर्ष अनिल व आठ वर्ष आणि सुमन तीन वर्ष या चौघा भावांचा खून कुराडीचा घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे गंभीर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचार्यांसह पोलीस अधिकारी हे देखील घटनास्थळी हजर झाले होते तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेऊन पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिस अध्यक्षांनी एस आर टी पथक तसेच चार प्रथम दर्जाचे पोलीस निरीक्षक फिंगरप्रिंट एक्सपोर्ट आधी पथकांकडून या घटनेचा तपास वेगाने सुरू केला होता.
घडलेली घटना गंभीर असून ही चार मुलांच्या त्या कुळाने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती येथे कुळा घरात सापडले असून याबाबत फॉरेन्सिक फिंगरप्रिंट शासनाकडून पथकाकडून तपास सुरू झाला आहे असे पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सदर घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली तसेच या प्रकरणी तातडीने संचित आरोपींना शोधा आणि त्यांना अटक करून आणा असे आदेश त्यांनी तपास यंत्रणेला दिले यावेळी पोलीस अध्यक्ष डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अध्यक्ष चंद्रकांत गवळी उपस्थित होते.
दरम्यान सायंकाळी उशिरा तपास यंत्रणेने पावरा समाजातील एका हॉटेलमध्ये काम करणारे पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्यापैकी टीकेमुळे त्यांच्या समाजाचे असल्याची माहिती मिळाली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून कळाले.