नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९,९७४ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात रायगड ६७२, पुणे जिल्हा ५८७, पुणे शहर २८६, पिंपरी-चिंचवड ३८६, सातारा ९२९, कोल्हापूर १५२५, सांगली १२०५, सिंधुदुर्ग ५०८, रत्नागिरी ५८३ नवे रुग्ण आढळले. विदर्भ आणि मराठवाडय़ातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात रविवारी ९,९७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी ८,५६२ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ५७,९०,११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.















