नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ८८ दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार २५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ४२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ICMR च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ३९,२४,०७,७८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत १३,८८,६९९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रविवारी देशात ५२,२५६ नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर ७७,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात काल (रविवार) १४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. यापुर्वी २३ मार्चला ४७,२३९ रूग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.
देशात आतापर्यंत २,९९,३५,२२१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २,८८,४४,१९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३,८८,१३५ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ०२ हजार ८८७ बाधित रुग्णांवर उपचार सूरु आहेत.\
राज्यातली स्थिती
राज्यात काल (रविवारी) ९३६१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९१०१ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,१९,४५७ इतकी झाली आहे. आज १९० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या १,३२,२४१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात काल ८,९१२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर १०,३७३ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.