मुक्ताईनगर (प्रतिनिधी) वारंवार लग्नाचा आग्रह धरला म्हणून ३६ वर्षीय तरुणीला विहीरीत ढकलून पाण्यात बूडवुन जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शे गुलाम ईद्रीस गुलाम ((वय ४५, रा. हरिपुरा बुऱ्हाणपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात शे फरीद शे मुसा (वय ३६, वडनेर भोलजी ता नांदुरा जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अफसाना बी गुलाम ईद्रीस हिने शे गुलाम ईद्रीस गुलाम (वय ४५, रा. हरिपुरा बुऱ्हाणपूर) यांच्याकडे वारंवार लग्नाचा आग्रह धरला म्हणुन त्याचा राग येवुन शे गुलाम ईद्रीस गुलाम याने फिर्यादीची बहीण अफसाना बी हीस धाबे शिवारातील रवींद्र भास्कर पोहेकर यांचे शेतात नेवून शेतातील विहीरीत ढकलून दिले. एवढेच नव्हे तर अफसाना बी मोटारीचे पाईप व वायरला धरुन विहीरीतून बाहेर येवु नये म्हणुन पाईप व वायर कापुन तिला पाण्यात बूडवुन जिवे ठार मारले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शे गुलाम ईद्रीस गुलाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहेत.