वाराणसी (वृत्तसंस्था) ज्ञानवापी मशिदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. आज ज्ञानवापी मशिद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच, सुप्रीम कोर्टाने यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी सत्र कोर्ट सुनावणी घेऊ शकणार नाही, पुढील ८ आठवड्यापर्यंत आदेश कायम आहे. सर्व प्रकरण आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस नरसिम्हा आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्देश दिले की, खालच्या कोर्टाने मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा. तसंच, जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय घेत नाही. तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम राहणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
तसंच, आम्ही खालच्या कोर्टाला लवकरात लवकर सुनावणी घेण्यास कोणताही दबाव किंवा विशेष आदेश देऊ शकत नाही. कारण ते आपल्या कामात योग्य आहे, सर्व प्रकरण हे जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, या प्रकरणावर आठ आठवड्यात सुनावणी घ्यावी, असं निर्देश कोर्टाने दिले आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले, ते पुढील सुनावणी करतील.शिवलिंगाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश कायम राहणार आहे. उत्तर प्रदेश सरकार वजू करण्याची व्यवस्था करेल, सर्वोच्च न्यायालय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.