अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव येथील शिक्षिका शारदा त्र्यंबक उंबरकर यांना १० डिसेंबर रोजी “जागतिक मानव अधिकार” दिना निमित्याने केंद्रीय मानव अधिकार संघटनेच्यावतीने “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मानव अधिकारी संघटनेच्या नागपूर येथील शाखेच्या वतीने नागपूरच्या शंकर नगर स्तिथ साई सभागृहात जागतिक मानव अधिकारी दिवसानिमित्त एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त या सोहळ्यात राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर) अभिजीत देशमुख, संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले, संजय पांडे (वरिष्ठ पोलिस उपअधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक नागपूर), डॉ. ईश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय मानव अधिकार संघटन नई दिल्ली), ॲड. संजय कुस्तवार (अधिवक्ता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली), ॲड. अमन मारेकर (राष्ट्रीय विधी सल्हाकार, केंद्रीय मानव अधिकार संघटन नई दिल्ली), प्रकाश भागवत (मराठी सिने अभिनेता व हास्य कलाकार मुंबई), ब्रह्मकुमारी मनीषा दीदी (वरिष्ठ राजयोग शिक्षिका प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागपूर), अश्विनी चंद्रकापुरे (मराठी सिने अभिनेत्री मुंबई) उपस्थित होते.नागपुर येथील प्रसिद्ध असलेल्या साई सभागृहात हा भव्यदिव्य “ पुरस्कार’ सोहळा पार पडला.
या सोहळ्यात महाराष्ट्र, बिहार, आंध्रप्रदेश, राजस्थान, गोवा, इत्यादी राज्यातील जेष्ठ समाजसेवक उपस्थित होते. याची दखल घेत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने सन्मानीत महानुभाव उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते अमळनेर, जिल्हा जळगाव येथील शिक्षिका शारदा उंबरकर यांना मानव अधिकार “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” यांना देऊन गौरविण्यात आले. शारदा उंबरकर हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, वृक्षारोपण, जनजागृती क्षेत्रातून निःस्वार्थ भावनेने समाज सेवा करीत आहेत. भारतीय संविधान अभ्यासक तसेच गोर गरीब लहान मुलांना शिक्षणासाठी व शोषित वंचित घटकांसाठी समाज उपयोगी कार्य करत आहे. या बाबतीत मुले पैसे परिवार आणि संसार यामध्ये अडकून असतात पण उंबरकर अहोरात्र दिवस निस्वार्थ देश सेवा करत जनजागृती सोबत सामाजिक एकोपा जपण्यासाठी व महापुरुषांना अपेक्षित तरुण भारत यासाठी कार्यरत आहेत. या कार्यातून वेगळ्या आदर्श समाजापुढे उभा केला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.