नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची आवश्यता असतांनाही त्या न करता कोरोना लसीच्या वापरास परवानगी दिल्याचं काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. कोरोनाची लस कोरोना हरवण्यास सक्षम आहे तर मग सरकारमधील नेत्यांनी का कोरोनाची लस घेतली नाही, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. देशात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लसीकरणाच्या मोहिमेचं उद्धाटन केलं आहे.
कोरोना महामारी विरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईच्यादृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एकीकडे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होताच, दुसरीकडे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारला लसीकरणावरून काही प्रश्न विचारले आहेत. “लस जर एवढीच सुरक्षित आणि विश्वसनीय आहे व तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यापलिकडची आहे. तर, मग असं कसं होऊ शकतं? की सरकारशी निगडीत कुणीही लस टोचून घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जगातील अन्य देशांमध्ये असं झालं आहे.” असा प्रश्न मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. “अनेक नामांकीत डॉक्टारांनी कोव्हॅक्सिनच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. संपूर्ण जगात अनेक नेत्यांनी पुढे येत स्वतः लस टोचून घेतली आहे. मात्र, भारत सरकारशी निगडीत कोणीही असं का केलं नाही?” असं मनीष तिवारी म्हणाले आहेत. तसेच, “मनीष तिवारी यांनी लशींच्या वापरास मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी काही धोरणात्मक चौकट नाही. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी सरकारसमोर कोव्हॅक्सिनची परिणामकारकता आणि सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, कोणती लस घ्यावी याची निवड नागरिकांना करता येणार नाही.” असं देखील मनीष तिवारी यांनी बोलून दाखवलं आहे.
भारतापुर्वी जगात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, अनेक देशात कोरोनाचा पहिला डोस हा राष्ट्रप्रमुखांना देण्यात आला. अमेरिकेत जो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस बरोबर ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेझ आणि बोरिस जॉन्सन यांनी कोरोना लसीचा पहिला मान पटकावला. इतर देशातील प्रमुखांना कोरोनाची लस घेतली आहे. मग भारतात सरकारमधील कोणत्याही नेत्याने लस का घेतली नाही? कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा होत आहे? मग नेते मंडळी का लस टोचत नाही. असे म्हणत तिवारा यांनी सरकारवर निशाणा साधला.