बीड (वृत्तसंस्था) वादग्रस्त ठरलेल्या मैत्रेय फंडमध्ये राज्यातील अनेक लोकांनी पैसा गुंतवला होता. पण, संचालकांनी लाखो ठेवीदारांना गंडा घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात येऊन एकत्रित आत्मदहन करू, असा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.
कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता मैत्रेय फंड पैसे गोळा केलेल्या ठेवादारांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यातील २५ ते ३० हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्ती व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. ‘लोकं दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या देत आहेत आणि त्यांचे पैसे द्यायचे आहे, असं म्हणताना अक्षरशः ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी आले. आतापर्यंत शहरात पैसे बुडाल्यामुळे काही जणांनी आत्महत्या देखील केली असल्याचंही महिलांनी सांगितले आहे.
दरम्यान, कराड जनता सहकारी बँक आता अवसायनत मध्ये गेल्याचं सहकार आयुक्तांनी जाहीर केलं आहे. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे.