चाळीसगाव (प्रतिनिधी) ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
३० आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यानंतर आज पहाटे ना. जयंत पाटील हे चाळीसगावात दाखल झाले आहेत. याप्रसंगी पाहणी करण्याआधी पत्रकारांशी बोलतांना ना. जयंत पाटील म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न एऊ, उइख या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच १२ सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.