TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गुणगौरव : ९० गुणवंतांचा सन्मान, ४ मान्यवरांना समाज भूषण

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी, दि. २२ जून २०२५ : परीक्षा कोणतीही असो यश-अपयश सुरूच असते मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा यशाचा पाठलाग करावा. गुणगौरव सोहळ्यात सन्मान स्वीकारल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढते. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते तरी आज अनेक लोक यशस्वी झालेले आहेत. आज प्रत्येकाने मोबाईल आणि एआय तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

वैश्यवाणी युवा फाऊंडेशनच्या वतीने आज बळीराम पेठ येथील ब्राह्मण समाज कार्यालयात वैश्यवाणी समाजातील दहावी, बारावी, आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी आणि सचिव राकेश वाणी यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला समाजातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

READ ALSO

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी : आ.राजुमामा भोळे
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश उर्फ राजुमामा भोळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले, “शिक्षण हे विकासाचे प्रवेशद्वार आहे आणि वैश्यवाणी युवा फाउंडेशनने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत आणि अशा उपक्रमांमुळे त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळते. समाज आपल्याला जोडून ठेवतो. समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समाज भूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अनिल अमृत वाणी, पुणे येथील बाल साहित्यिक चिन्मयी शेटे, माजी सैनिक आणि तलाठी संदीप सूर्यवंशी तसेच युवा उद्योजक आणि ऑक्सिमाइन वॉटरचे राकेश निंबा वाणी यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. चिन्मयी शेटे म्हणाल्या, साहित्य आणि शिक्षण यांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. राकेश शेटे यांनी ब्रँड तयार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवावा लागतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील असेच ध्येय ठेवावे असे त्यांनी सांगितले. संदीप सूर्यवंशी म्हणाले की, मी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवीन ध्येय गाठण्याचे स्वप्न पाहिले. सातत्य ठेवल्याने एकाच वेळी ५ परीक्षा उत्तीर्ण झालो. आपण आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्य ठेवले तरच यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

९० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
गुणगौरव सोहळ्यात ९० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि फोल्डर फाईल देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षणातील आव्हाने आणि यशाबद्दल विचार व्यक्त केले. दहावीची विद्यार्थिनी म्हणाली, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यापुढेही मी मेहनतीने समाजाचे नाव उंचावेन.” बारावीच्या विद्यार्थ्याने आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळे मला माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी बळ मिळाले आहे.

फाऊंडेशनचे भविष्यातील उपक्रम
प्रास्ताविकात चेतन वाणी यांनी सांगितले की, हा गुणगौरव सोहळा दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला असून, भविष्यात समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातील. सूत्रसंचालन करताना राकेश वाणी यांनी समाज एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “समाज एकजूट करणे हे मोठे आव्हान आहे. येणाऱ्या काळात वधू-वर परिचय मेळावा, समाजाचे अधिवेशन आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपर्क सूची तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.” यासोबतच त्यांनी सर्वांना शिक्षण आणि सामाजिक कार्यात पुढे येण्याचे आवाहन केले.

समाजबांधवांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी, सचिव राकेश वाणी यांच्यासह मुकेश जाधव, पंकज शेटे, हर्षल वाणी, प्रसाद वाणी, परी वाणी, वसीम खान, जकी अहमद आणि सुनील भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी फराळची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. निकिता शेटे यांनी आभार प्रदर्शन केले.

समाज एकजुटीसाठी प्रेरणादायी पाऊल
गुणगौरव सोहळा वैश्यवाणी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच समाज एकजुटीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला. उपस्थितांनी फाऊंडेशनच्या कार्याला पाठिंबा दर्शवत भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीआरपी घोटाळा प्रकरण : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

December 13, 2020

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले ; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

June 1, 2021

निवडणुकीच्या भीतीमुळे व्याजदर कपातीचा निर्णय बदलला : दिग्विजय सिंह

April 1, 2021

शरीरसंबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; महिलेचे आर्थिक शोषण, वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

March 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group