चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतात व गावांमध्ये पाणी शिरले होते. यात पिंपरखेड येथे शेतात बांधलेले पोल्ट्री फार्मचा शेडच वाहून गेल्याने त्यातील सुमारे दहा हजार कोंबड्या वाहून गेल्याने जवळपास २० लाखाचे नुकसान झाले आहे.
पिंपरखेड येथील वसंतराव मोरे यांनी शेतात पोल्ट्री फार्मचे दोन शेड उभारलेले होते. हे दोन्ही शेड पुरात वाहून गेल्याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये दहा कोंबड्या होत्या. परंतु, पुराच्या पाण्यात शेडसह दहा कोंबड्या वाहून गेल्याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांचे पिंपरखेड शिवारातील शेतात असलेल्या शेडच्या भिंती पडल्या आहेत. तसेच पत्रे उडून गेली आहेत. शिवाय केलेली पाईप लाईन देखील पुरात वाहून गेली आहे. तसेच शेडमध्ये असलेल्या कोंबड्या पुरात वाहून गेल्याने जवळपास २० लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाने या शेडमधील झालेल्या नुकसानीच्या पंचनामा करून भरवाई द्यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.