TheClearNews.Com
Friday, January 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ का थांबले नाही? : शिवसेना !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख, पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का होत आहेत?, अशा शब्दात शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर टीका केलीय.

“जम्मू-कश्मीरमध्ये उद्योग उभे राहतील, व्यवसाय सुरू होतील, स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, प्रामुख्याने विस्थापित कश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ होऊन त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित जीवन जगता येईल, जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा पूर्वीचे ‘नंदनवन’ अवतरेल असे एक चित्र उभे केले गेले. मागील दोन वर्षांत जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती कशी सुरळीत होत आहे, दहशतवाद्यांचे कसे कंबरडे मोडले आहे, अशा वल्गना केल्या गेल्या. आपल्या लष्कराने या काळात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, दहशतवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यात १५ चकमकींमध्ये २७ दहशतवाद्यांचा खात्मा केला हे खरेच, पण दुसऱ्या बाजूला दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होतच आहेत. निरपराध नागरिकांचे बळी जातच आहेत. चारच दिवसांपूर्वी आमरिन भट या कश्मिरी पंडित अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केली गेली. त्याआधी बडगाम जिल्हय़ात चडुरा तहसील कार्यालयात घुसून राहुल भट या कर्मचाऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या,” असा उल्लेख या लेखात आहे.

READ ALSO

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

“जम्मू-कश्मीरसंदर्भात केंद्रातील सरकार अनेक दावे करीत असते. मात्र त्यांचे हे दावे आणि वादे फोल ठरविणारेच चित्र जम्मू-कश्मीरमध्ये दिसत आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेले ‘टार्गेट किलिंग’ थांबविण्यात सरकारला यश आलेले नाही. मंगळवारीदेखील कुलगामच्या गोपाळपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. दहशतवादी शाळेत घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला. त्यात शाळेत येत असलेल्या रजनी बाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरे म्हणजे रजनी यांची बदली चवलगाम येथे झाली होती. त्या तेथे रुजू होणार होत्या. मात्र मंगळवार त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने आवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बचावल्या. तथापि, दहशतवाद्यांचा हेतू आणखी एका निरपराध कश्मिरी पंडिताचा बळी घेणे हाच होता, हा या हल्ल्याचा दुसरा अर्थ आहे. ३७० कलम हटविल्यानंतर तरी जम्मू-कश्मीर शांत होईल, तेथील सामान्य जनता सुरक्षित जीवन जगेल अशी अपेक्षा होती. ज्यांनी हे कलम हटवले त्यांनीही तसेच दावे आणि वादे केले,” असं सामनाच्या अग्रलेखमध्ये म्हटलं आहे.

तसेच, “दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख, पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का होत आहेत? कालपर्यंत या प्रश्नांचा जाब तुम्ही मागील राज्यकर्त्यांना विचारीत होता. आज तुम्हालाही या प्रश्नांचा ‘जवाब’ द्यावाच लागेल. कारण तुमच्याही राजवटीत कश्मीरमधील हत्यासत्र सुरूच आहे आणि ‘‘सामूहिक स्थलांतर करू’’ असा अल्टिमेटम देण्याची वेळ कश्मिरी पंडितांवर आली आहे,” असं म्हणत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधलाय.

 

“पुलवामामधील काकापोरा येथे आरपीएफचे दोन जवान, श्रीनगर येथील पोलीस शिपाई गुलाम हसन आणि सैफुल्ला कादरी या पोलिसाचे वडील मोहम्मद कादरी यांचीही अशीच निर्घृण हत्या करण्यात आली. आता रजनी बाला या पंडित शिक्षिकेलाही दहशतवाद्यांनी ठार केले. १९९० च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या नशिबी आलेल्या विस्थापनाबद्दल, त्यांच्या शिरकाणाबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारेच मागील आठ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
जळगाव

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

January 9, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी दोन ठिकाणी एटीएम फोडले ; दहा लाखाची रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येणार नाही : फडणवीस

October 20, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, १५९ झाले बरे !

June 24, 2021

जळगावातील त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी !

July 9, 2022

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार ; २४ तासांत १४ जणांनी गमावला जीव !

July 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group