TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दि ग्रेट महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मूकनायक बोलू लागलाय...!

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) विश्वरत्न महामानव राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कधी नव्हती एवढी अपरिहार्यता अलीकडे निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील आणि त्यानंतरच्या संविधान अस्तित्वात आल्या नंतर, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची विदवत्ता आणि देशा प्रतीची प्रखर राष्ट्रभक्ती देशाने अनुभवली.

त्या कालखंडातील मूकनायक सध्याच्या वर्तमान काळात आमच्या राजकीय, सामाजिक अन सांस्कृतिक जगतात महानायक म्हणून “जयभीम,” “काला”, आर्टिकल 15, ” मसान”, “झुंड” आदी मधून भारतीय संविधानाच्या अरिहार्यतेची जाणिव जागृतीची आठवण करून देत चित्रपट रूपाने समता, न्याय विषयीचे एक वैचारिक वादळ निर्माण करत आहे. बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या अलीकडच्या चित्रपटांची निर्मिती मागचा संदेश समजून घेण्यासह तो आचरणात आणण्यासाठी केलेला एक प्रयास म्हणता येईल. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘ मुकनायकाने ‘ ज्यांना आवाज दिला, ते आता बोलू लागले नाहीत तर विषय ही मांडू लागले आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून ‘मुकनायकाचा’ राष्ट्र, समाज रुपी समतेचा मानवीय किरदार प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठळकपणे ठाव घेत चर्चिला जात आहे.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

जस जसा काळ पुढे जात आहे, तस तसं बाबासाहेब भारतीय समाजासाठी विशेषतः दलित, बहूजन आणि अल्प संख्याकांसाठी प्रभावी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. हे या शतकातील वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर काढण्यात येणारे चित्रपट, हा त्याचाच परिपाक म्हणता येईल. त्यांच्यावर अनेक चित्रपट निर्माण केले जात आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आप आपल्या परीने बाबासाहेबांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, करीत आहेत. बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कलाकारांनी ही तेवढ्याच धाडसाने आणि जीव ओतून स्क्रीनवर बाबासाहेब जिवंत केला आहे, हे विशेष !

पहिले पाऊल महाराष्ट्राचे…..
महामानव बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण नंतर देशात सर्वात आधी सन 1968 मध्ये महाराष्ट्र शासनाने ” महापुरुष बाबासाहेब” या टायटलने मराठी भाषेतील लघुपटाची निर्मिती केली होती. 18 मिनिटांच्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. अलीकडे प्रदर्शीत झालेल्या ” जयभीम” या तेलगू चित्रपटाने देशातील बाबासाहेबांचे अनुयायी आणि समाज परिवर्तनाच्या लढ्यातील लोकांचे लक्ष्य वेधून घेतले, तत्पूर्वी सन 2000 मध्ये डॉ जब्बार पटेलद्वारा दिगदर्शित बाबासाहेब आंबेडकर : अन टोल्ड ट्रुथ… हा इंग्रजी भाषेतील एक उत्कृष्ट चित्रपट होता. यात कन्नड अभिनेते मांमुट्टी यांनी बाबासाहेबांची व्यक्ती रेखा साकार केली होती आणि गुजराथी, हिंदी भाषेसह विविध भाषेत ती डब केली गेली.

… कभी हम बहुजन ,कभी हरिजन हो जाते है, सिर्फ जन नही बन पाते…!
आर्टिकल 15 या हिंदी चित्रपटा मधील हा संवाद दलितांची अवस्था अधोरेखित करणारं आहे, सत्तर वर्षा नंतर ही परिस्थिती बदलली नाही. संविधानास अभिप्रेत असलेली समता, बंधुता न्याय, पूर्णपणे मिळालेला नाही…हा संदेशच नव्हे काय? बाबासाहेबांनी संपूर्ण चळवळ, वैचारिक लिखाण, आरक्षण, धर्मांतर, समस्त मानव जातीच्या आत्मसन्मानासाठीचा संघर्ष, लढा आता चित्रपटाच्या माध्यमातून मांडला जातोय, थोडक्यात आता मूक नायक बोलू लागलंय, व्यक्त होतोय…. एका राष्ट्रीय महानायकाची कला माध्यमाने घेतलेली दखल, कालसापेक्षच नव्हे का?

इतिहास वो नही जो लिखा गया है
इतिहास वो भी नही,
जो तुमको पढ़ाया गया,
इतिहास वो है जो तुम्हारे बाप दादा ने सहा और जो लिखा ही नही गया..!”

सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
8888889014

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

"जय भीम" चित्रपट नव्हे, राज्यघटनेबद्दल आस्था निर्माण करणारी चळवळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : डांभुर्णीच्या ‘सिरीयल किलर’ला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा !

May 9, 2022

चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

September 25, 2020

शेतकरी आणि सरकारमध्ये एक फोन कॉल दूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 30, 2021

मलिक, वानखेडेंचे प्रश्न विचारू नका, मला तेवढाच उद्योग नाही ; अजित पवार भडकले

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group