मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शेतात पार्टी केल्यानंतर चुलत भावांनीच भावाला संपविल्याची धक्कादायक घटना दि. २६ रोजी मुक्ताईनगरातील महालखेडा शेतशिवारात घडली. सुनिल सुनिल रामसिंग चव्हाण (वय ३२, रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या खूनाला शेतीच्या वादाची किनार असून या घटनेमुळे खळबळ माजून गेली होती. मुक्ताईनगर पोलिसांनी एकाला बऱ्हाणपूर तर दुसऱ्या गावाहतून अटक केली. दरम्यान, संशयितांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे सुनिल चव्हाण हे वास्तव्यास होते. त्यांचे वडीलोपार्जीत महालखेडा व टाकळी शिवारात शेत जमीन आहे. परंतु ही शेतजमीन करण्यावरुन त्यांच्या भावांमध्ये वाद सुरु होते. दि. २६ रोजी सकाळी ६ वाजता सुनील चव्हाण हे सुरेश मकराम चव्हाणच्या शेताजवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचे भाऊ व पुतण्यास हे दुचाकीने त्याठिकाणी पोहचले असता, सुनिल चव्हाण हे बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. तसेच त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता आणि जवळच त्याची दुचाकी देखील लावलेली होती. गावातील रायसिंग जाधव, आनंदा चव्हाण, राहुल जगन चव्हाण हे त्याठिकाणी आले असता, त्यांनी सुनिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासुन सुनीलला मयत घोषित केले.
पार्टीसाठी शेतात घेवून गेले होते साहित्य
सुरुवातीला पोलीसात अकस्मता मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला असता, त्यांना दि. २५ रोजी सायंकाळी सुनिल चव्हाण यांना प्रवीण जगन जाधव याचा फोन आला होता. त्यावेळी ते घरातून ताट, पातेले आणि भाजीसाठी लाणारे मसाले घेवून जात होते. यावेळी त्यांची आईने त्यांना विचारले असता, त्यांनी प्रवीण, बाळू जाधव आम्ही शेतात पार्टी करीत असल्याचे सांगितले.
शेताच्या रस्त्यावर फेकून दिला मृतदेह
घरातून निघालेल्या सुनिल यांनी चुलत भावांसह महालखेडा शिवारातील त्यांच्या शेतात पार्टी केली होती. त्यानंतर सुनिल चव्हाण हे घरी परतले नसल्याने त्यांच्या मृत्यूबाबा देखील प्रवीण चव्हाण, बाळू जाधव यांनी कोणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांनी इतर कोणाच्या तरी संगनमताने हत्याराने वार करुन सुनिल यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह शेताच्या वाटेला जाणाऱ्या रस्त्यावर टाकून दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी प्रवीण जगन जाधव व बाव ममराज जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.