लखनऊ (वृत्तसंस्था) हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळाला. आमच्यावर दबाव आणला जात आहे. माझ्या बहिणीवर दोनवेळा अत्याचार करण्यात आले आहेत. दुसऱ्यांना पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळले. माझ्या बहिणीने असा काय गुन्हा केला होता? तिला रात्रीच पेट्रोल टाकून जाळले. आम्ही हात जोडले, पाया पडलो. त्यांच्यापुढे लोटांगण घातले. मात्र, पोलिसांनी काही ऐकले नाही, आमच्या बहिणीवर त्यांनी दुसऱ्यांदा अत्याचार केले, असा थेट आरोप पीडितेच्या भावाने एका चॅनेलशी बोलतांना केला आहे.
अजब आणि संतापजनक पोलिसांचा दावा
अखेर हाथरस गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मीडियाला भेट घेता आली. या कुटुंबाचं दु:ख पहिल्यांदाच जगाच्या समोर आले आहे. आमच्यावर अन्याय झाल्याची पीडित कुटुंबाने भावना व्यक्त केली आहे. आमच्यावर दबाववाढविण्यात येत आहे. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली सांगत आहेत, तसे काहीही झालेले नाही. गावात कोणालाच प्रवेश नसताना भाजपचे दोन लोक गावात कसे आले, असा सवालही पीडितेच्या भावाने मीडियासमोर उपस्थित केला.
आम्ही कोणत्याही राजकीय दवाबाला बळी पडणार नाही. काँग्रेसकडून आम्हाला ५० लाख रुपयांची ऑफरही देण्यात आलेली नाही. माझ्या नातेवाईकांशी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला कोणीही कसलेली पैशाचे आमिष दाखविलेले नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले.