TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील तोडे परिवाराने मुलीचा केला सत्यशोधक पद्धतीने विवाह !…

सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे ही काळाची गरज : प्रा डी आर पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री )

vijay waghmare by vijay waghmare
December 29, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव : येथील तोडे परिवाराने आपल्या मुलीचा सार्वजनीक सत्यधर्मीय पद्धतीनुसार सत्यशोधक विवाह लावुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने उजाळा देत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. ज्या महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले मनुस्मृतीला मूठमाती देण्याचे काम केले, मात्र ज्यांना शिक्षणाचा अधिकार दिला तेच पेशवाईचे अनुकरण करत आहेत वैदिक लग्राच्या नावाने पेशवाईची घुसखोरी सुरू झाली आहे. लग्राचे आधी प्री – विडींग शूटिंगच्या नावाने विचित्र प्रथा सुरू झाली. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे पागोटे डोक्यावर घेण्याऐवजी पेशवाईची पगडी व ड्रेस घालून विचित्र प्रथा वाढू लागली आहे. एकाच दिवसात दोन वेळा लग्न लावणारी वर वधूंच्या माता-पितांना खाईत नेणारी हि प्रथा आहे. मात्र ओझर ता.चाळीसगाव येथील सौ.शोभा व बाबुलाल सुकदेव शिरसाठ ( वरिष्ठ सहाय्यक जिल्हा जलसंधारण विभाग जि.प. जळगांव ) यांचे सुपुत्र सत्यशोधक ललित व सौ.सुनिता व संजय भिमराव तोडे रा. धरणगाव जि.जळगांव यांच्या सुकन्या सत्यशोधिका रुपाली यांचा शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी या सर्व घातक रूढी परंपरा झुगारून तेली समाज मंगल कार्यालयात सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केला. या विवाहानिमित्त शिरसाठ परिवाराकडून सत्यशोधक समाज संघास पाच हजार रुपयांचा सहयोग निधी विधीकर्ते भगवान रोकडे, विलास माळी यांच्याकडे रितसर पावती घेऊन सुपूर्द केला. सदरील विवाह सोहळा खंडोबाची तळी भरून बेल भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करण्यात आला. या वेळी विवाह मंचावर त.गौतम बुध्द, जगद्गुरु तुकोब्बाराय, राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर, राष्ट्रपिता जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमांचे पूजन वधू-वर व त्याच्या माता-पित्यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तद्नंतर सार्वजनिक सत्यधर्माची सामूहिक प्रार्थना वाचन करण्यात आली. नंतर वधू-वरांनी एकमेकांना जीवनभर साथ देण्याची, तसेच निर्व्यसनी राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची व सार्वजनिक सत्यधर्मीय विचार आचरणात आणण्याची शपथ घेतली, तद्नंतर राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टक गायन करून विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी धरणगांव येथील प्रा.दिलीप रामु पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री ), नायब तहसिलदार प्रथमेश मोहळ, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे सरकारी वकील डी बी गायकवाड, प्रा.डॉ. अंबादास सगट थोर साहित्यिक आणि विचारवंत कन्नड, प्रा.डॉ.उदय जगताप (प्राचार्य कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव), अमोल पाटील (जिल्हा जलसंधारण अधिकारी जळगांव), उपविभागीय अधिकारी निरज भिमराव, विरवाडकर साहेब, कांबळे साहेब, संजय चव्हाण, समता सैनिक दलाचे धर्मभुषण बागुल, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कार्यध्यक्ष कैलास जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, आबा पहिलवान, ह.भ.प. महंत श्री सुरेश महाराज शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती विवाह सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणून शिरसाठ व तोडे परिवाराने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. या विवाहास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, जलसंधारण, कृषी, शैक्षणिक, सांस्कृतिक व महसूल विभागातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहुन या विवाहाचे कौतुक करत वधूवरांसह त्यांच्या माता पित्यांचे अभिनंदन केले. वधू वरांना विधीकर्ते भगवान रोकडे, विलास माळी आणि वधू-वरांच्या माता-पितांच्या हस्ते विवाहाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026
Next Post

जळगावच्या जोशी कॉलनीत अवतरले गोकुळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करून अटक करा ; धरणगाव शहर मुस्लीम समाजाची मागणी !

June 7, 2022

भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाच घेताना पकडले ; लोकांनी वाटले पेढे !

April 27, 2023

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले, अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू !

March 25, 2023

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

November 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group