जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकोद जवळील वडगाव येथील एका तरुणाने एकनाथराव खडसे यांना केलेल्या मोबाईल कॉलची रेकार्डिंग व्हायरल झाली आहे. त्या खडसे यांच्या आवाजातील, मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले. दरम्यान, सोशल मीडियात व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लीप चर्चेत आल्याने खळबळ उडाली आहे.
वडगाव बुद्रुक गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. हे गाव गिरीश महाजन यांच्या मतदार संघात येते. गावात पाणी नसल्याने गावातील एक तरुण राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंना फोन करून तक्रार करतानाचा संवाद व्हायरल झाला आहे. या संवादात जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकला पाणी नाही अशी तक्रार युवक करीत असताना खडसे यावर त्याला विचारतात की, कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला…का…? आमदार काय करतोय गिरीश… इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता…’आमदार फोन उचलत नाही, असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात… की पोरींचाच फोन उचलतो. अशाप्रकारचा सवांद त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर याविषयी गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा गिरीश महाजन यांनी म्हटले की, यामध्ये एकनाथ खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.