मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत त्याच्यातून येणाऱ्या परिणांमांची काळजी करावी पण भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
गेले काही दिवस महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक बेछुट आरोप करत आहेत. हे आरोप करताना भाजप आणि फडणवीस यांना त्यात ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील. मलिकांना पुराव्याशिवाय बोलण्याचे परिणाम भोगावे लागतील. मूळ मुद्द्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा प्रकार केला जातोय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना संप सुरु आहे, त्यावर बोला. अनिल देशमुखांची काळजी करण्याऐवजी जे वानखेडेंची काळजी करत आहेत. वानखेडेंच्या मागे समाज उभा आहे. चौकशी करा, बेछूट आरोप का करताय? असा सवाल पाटील यांनी मलिकांना केलाय.
आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून आरोप केले जात आहेत. नीरज गुंडे हा चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. काही पुरावे असतील तर चौकशी करा. एक संजय राऊत कमी होते, त्यांच्या जोडीला आता मलिक आहे. सीबीआय चौकशी करायची तर करा. १९ महिन्यात तुम्ही आमचं काही वाकडं करु शकलेले नाहीत, अशा शब्दात पाटील यांनी मलिकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय.