धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. १५ दिवसात त्यांचे विषय मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा दिव्यांग महासंघाचे राज्य प्रमुख पी. एम. पाटील सर यांनी दिला आहे. ते आज धरणगावात तालुका दिव्यांग बांधवांच्या बैठकीत बोल होते.
तालुक्यातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा दिव्यांग महासंघाचे राज्य प्रमुख पी. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अँड वसंतराव भोलाणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या प्रसंगी जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन पाटील,आदिवासी महासंघाचे प्रदेश उपप्रमुख जंगलु चव्हाण,परीट समाजाचे अध्यक्ष विनोद रोकडे,तालुका प्रमुख संजय पाटील,महिला प्रमुख प्रतिभा पाटील, सरला सोनवणे, दीपिका पाटील हे उपस्थित होते. यावेळी अँड.भोलाणे यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. दिव्यांगांना मार्गदर्शन करताना पी.एम. पाटील सर यांनी सांगितले की, धरणगाव तालुक्यात 7 हजार तर धरणगाव शहरात एक हजार दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या असून त्या सोडवण्यासाठी तसेच अंत्योदय योजना,अपंगांना साहित्य मिळत नाही. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ता दिव्यांगांना मोफत साहित्य देणार आहे.
35 किलो मोफत धान्य,अनेक दिव्यांग बांधवांना अद्याप पावतो मिळालेले नाही. अनेकांचे पगार झालेले नाही. अनेकांना कार्ड असून धान्य मिळत नाही, अशा विविध समस्या असून त्या तात्काळ सोडवण्यासाठी 4 हजार दिव्यांग बांधवांचा विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून 15 दिवसाच्या आत दिव्यांग प्रश्न नाही सुटले नाही तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येणाऱ्या नगरपालिका,पंचायतसमिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आली असून आपले काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे ताकदीने उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. जेणे करून आपले कामे होण्यास मदत होईल. या बैठकीला धरणगाव तालुक्यातील नांदेड,साळवा रोड निशाणे,पिंपळे,साखरे,चोरगाव, पथराड,कौठाळ,धार,शेरी,गंगापूरी,पाळधी,मुसळी,चिंचपुरा,पींप्री तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र काबरा,योगेश पी.पाटील,नंदकिशोर पाटील, रघुनंदन वाघ,योगेश पाटील,दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.