नवी मुंबई (वृत्तसंस्था) मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अजूनही तोडगा निघालेला नसून, दिवसेंदिवस आंदोलन चिघळताना दिसत आहे. चीनच्या किंवा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत.” शेतकरी आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
आज राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. शेतकरी आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती, असंही ते म्हणाले. शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही जसं ऐकता किंवा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टींवर पाहता, तसंच आम्हीदेखील पाहतो. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत?, त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे… वगैरे… पण प्रश्न असा आहे की, त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्याच काही त्रुटी असू शकतात निश्चित. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या किंवा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत.”