नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील तुकडे तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छित आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केले आहे.
मनोज तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, देशातील तुकडे तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छित आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जातेय, मोदीजींना धमकी दिली जातेय. एका योजनाबद्ध पद्धतीनं देशाचं वातावरण बिघडवण्यासाठी हा कट रचला जातोय. शाहीन बागमध्ये एनआरसी आणि सीएएचा विरोध करणाऱ्या तुकडे तुकडे गँगचे लोक शाहीन बाग २.० बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना देशातील शांतता नकोय, असाही दावा तिवारी यांनी केला. दुसरीकडे भाजपचे नेते आणि हरियाणा कृषी मंत्री जे पी दलाल यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानी शक्तींचा हात असल्याचा दावा केला होता.