पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही. पण आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) शोभत नसल्याची थेट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केली आहे.
‘मीच त्यावेळी बोलतो होते. माझं आजही म्हणणं आहे, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाकडे लक्ष द्यावे. देशातील प्रत्येक राज्य हे समान मुलासारखं असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राध्यान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. माझं त्यावेळी म्हणणं होतं, आजही तेच म्हणणं आहे, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे (Gujarat) आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे पंतप्रधानांना शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. सरकारच्या चांगल्या गोष्टीचे अभिनंदन मी केले असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवरही राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून एखाद दुसरे उद्योग इतर राज्यात गेल्याने काही फरक पडत नाही.
महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. कोणी कशावरही बोलायला लागले आहेत. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सर्व टीव्हीवर दाखवले जात आहे. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात एवढे प्रश्न असूनही राणे काय बोलले, राऊत काय बोलले, हेच सुरू आहे. शरद पवार मध्येच येतात आणि बोलतात. त्यामुळेच मी आता काहीही बोलत नाही.