मुंबई वृत्तसंस्था) बंदला आमचा पाठिंबा नाही. अशी राजकीय विधाने कुणी करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे खरे नागरिक आहोत का? शेतकऱ्यांचं देणं लागतो का? हा प्रश्न विचारला पाहिजे. बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका करतानाच बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
“देशातला शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेला समाज न्यायाच्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय. महाराष्ट्र न्यायप्रिय राज्य आहे. त्यामुळे वर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून बंद पुकारला आहे. राज्यातल बंद १०० टक्के यशस्वी होईल” असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “कोणत्या बसेस फुटल्या हे मला माहित नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे” असे राऊत म्हणाले.
“बंदला आमचा पाठिंबा नाही. अशी राजकीय विधाने कुणी करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे खरे नागरिक आहोत का? शेतकऱ्यांचं देणं लागतो का? हा प्रश्न विचारला पाहिजे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. कोणाला वाटतं असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं” असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे. “लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अशी जीपगाडी कोणाकडे असेल, तर त्यांनी रस्त्यावर आणावी” असे राऊत म्हणाले. “शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण ताकतीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. लोक उत्सफुर्तपणे बंदमध्ये सहभागी होत आहेत” असे राऊत यांनी सांगितले.