जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आज तब्बल ०८ तालुके निरंक आहेत.
जळगाव शहर – ०८, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०४, अमळनेर- ०२, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-०१, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००,रावेर-००, पारोळा-०३, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण २४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५५ हजार ६२१ पर्यंत पोहचली असून ५३ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत १३१९ रुग्णाचा मृत्यू झाले आहेत. तर ४१८ रुग्ण सध्या उपचार घेताय.
















