बोदवड:(प्रतिनिधी) : शहर विकासाच्या नावाखाली झाडांची होत असलेली बेसुमार कत्तलीमुळे पर्यावरणीय समतोल ढासळला आहे. वृक्षलागवड करणे ही काळाचीच नव्हे तर कायमचीच गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले. बोदवड महाविद्यालयात वृक्ष संवर्धनाबाबत कृतीपर उपक्रम नुकताच घेण्यात आला. बोदवड महाविद्यालयात शास्त्रोत्सव विभागाच्या वतीने या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी केली. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल,सचिव विकास कोटेचा यांच्या प्रोत्साहनातून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या साळसिंगी येथील सामाजिक वनीकरण विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेचे वनपाल श्री. नितीन वाघ यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या वृक्षलागवडीचा उपक्रमात वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणारे ,रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी संकल्प करणारे पर्यावरणप्रेमी राजूरचे श्री.शुभम कपाले , साळसिंगी येथे पत्रकार संदीप वैष्णव तसेच गोळेगावचे राहुल धनगर,संदीप मतकर यांच्या शेताच्या बांधावर उत्स्फूर्त सहभागातून वृक्षारोपण करण्यात नुकतेच आले व त्यांनी तसेच त्यांनी रोपे जगवण्यासाठी जबाबदारीही आनंदाने घेतली आहे .उन्हाळ्यामध्येसुध्दा झाडांना पाणी देऊन त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शास्त्रोत्सव विभागाचे प्रमुख डॉ. रुपेश मोरे , डॉ . रूपाली तायडे,सौ. कांचन दमाडे,श्री संदीप बरडे, दिपक जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. चौधरी , आकाश सोनवणे,डॉ. गीता पाटील डॉ. चेतन शर्मा, श्री. नरेंद्र जोशी ,सौ. रूपाली चौधरी,कार्यालयीन अधीक्षक श्री बी टी हिवराळे, वैभव पाटील, नामदेव बडगुजर यांचे सहकार्य लाभले .