जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या धडकेमुळे गाड्यांनी तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत आगीमुळे पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्रवासी बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि त्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला अशी माहिती समोर येत आहे.
पचपदरा येथील आमदार मदन प्रजापत यांनी सांगितले की, बसमधील प्रवासी हे तमिळनाडू, राजस्थान आणि इतर ठिकाणचे होते. या अपघातानंतर २१ जणांना बसमधून बाहेर काढले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
दुर्घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.