जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणपती नगरात आज दि २८ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कार आणि दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना घडलीये.
गणपती नगरातील रहिवासी श्रीची नरवानी यांच्या मालकीची कार अज्ञात माथेफिरुने आज पहाटे सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान जाळली. ही बाब लक्षात येताच नरवानी यांनी अग्निशमन दलाला आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत नरवानी यांची कार मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले आहे. नरवानी यांची कार जाळल्यानंतर माथेफिरुने परिसरात एक दुचाकी देखील जाळल्याचं समोर आलं आहे. या घटनेसंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.