बिहार (वृत्तसंस्था) बिहार मध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला आहे. राजदच्या उमेदवारांनी विजय झाल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करू नये. मतमोजणी वेळी उमेदवारांनी त्यांच्याच मतदारसंघात राहावे आणि विजयी झालेल्यांनी त्यांना मिळालेले सर्टिफिकेट घेऊनच पटण्या कडे कूच करावे, असा आदेश तेजस्वी यादव यांनी दिला आहे.
विजयाची जल्लोष यात्रा काढल्याने सामान्य नागरिकांना त्रास होईल, हा संदेश उमेदवारांपर्यंत पोहचविण्यासाठी राजद ने चार जणाची टीम बनवली आहे. यामध्ये सुनील सिंह, संजय यादव, श्याम रंजक आणि जगदानद सिंह आहेत. महत्त्वाचे म्हणजे एक्झिट पोल आणि विजयाचे संकेत दिल्याने पाटण्यातील राजदच्या कार्यालयाची रंगरंगोटी आणि साफसफाईचे काम देखील जोरात सुरू करण्यात आले आहे. बिहार मध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला यामध्ये भाजपा – महायुती, काँग्रेस राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष तिर्गी लढत झाली. यातच काल जाहीर झालेल्या एक्झिट पोल नी तेजस्वी यादव यांच्या राजद आघाडीला बहुमताचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यावर तेजस्वी यादव यांनी नेत्यांना महत्वाची सूचना जरी केली आहे. ९ नोहेंबर ला तेजस्वी यादव यांचा वाढदिवसही आहे. परंतु लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळालेला नाही. शपथ ग्रहण समारंभाला ते उपस्थित राहू नये म्हणून काही लोकांचे प्रयत्न आहे.