मुंबई (वृत्तसंस्था) जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का?, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी ‘उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर?’ कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, असा मिश्किल सवाल उपस्थितीत करून जयंत पाटलांच्या विधानातून हवा काढून टाकली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, असं शरद पवार म्हणाले.
जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. “राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ ५४ आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे”, असं ते म्हणाले होते. मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे, असं म्हणत त्यांनी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.
‘केंद्र सरकार सुरक्षा देत असेल तर आम्ही त्यात काही करू शकत नाही. राज्याच्या सुरक्षेचा मुद्दा असेल तर त्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारला आहे. पण, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्याबद्दल वरीष्ठ अधिकारी थ्रेट पर्सेप्शनचा अभ्यास करून निर्णय घेत असतात. फडणवीस सरकारच्या काळात माझी सुद्धा सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही काहीही आक्षेप घेतला नव्हता. आता केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.