गडचिरोली (वृत्तसंस्था) शेतीच्या कामासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील शेतशिवारात घडली. लक्ष्मण नानाजी रामटेके ( वय ५४) रा. महागाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. अहेरी
बुधवार, २६ जुलै रोजी सकाळी नेहमी प्रमाणे लक्ष्मण रामटेके हे आपल्या शेतात नेहमी प्रमाणे कामाला गेले होते. बुधवारी तालुक्यातील अहेरी, महागाव, चेरपल्ली, वांगेपल्ली, नागेपल्ली, आलापल्ली, पुसुकपल्ली आदी गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. महागाव (बु) येथेही पावसाची सुरवात होताच शेतकरी शेतीची काम करण्यासाठी बांधावर गेले होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास लक्ष्मण रामटेके यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, जावई व नातू असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर डोंगर कोसळले आहे. रामटेके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.