एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत,
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे निर्माण शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवहाटीमध्ये असल्याने महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले आहे. सरकार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसैनिकही आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे.
गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व कोणाकडे अशी चर्चा सुरु झालीय. यावर केदार दिघेंनी स्पष्ट सांगितले, “मी गेल्या २१ वर्षांपासून, आनंद दिघे साहेब गेल्यानंतर मी ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत युवासेनामध्ये कार्यरत आहे. मी वयाच्या ३८ व्या वर्षी त्या पदाचा राजीनामा दिला. कारण माझी इच्छा अशी होती की पाठच्या येणाऱ्या तरुणींनी या संघटनेसाठी काम करावं,” असं सांगितलं.
एकनाथ शिंदे हे मंत्री, आमदार होते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख होते. अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहे. मी ना कोणत्या पदावर होतो, ना आमदार, ना खासदार, ना कुठल्या पद्धतीच्या पदावर होतो. मी सर्वसामान्य कर्यकर्त्या आहे. तर मी ही जागा भरुन काढेन का? तुलना तेव्हाच होते जेव्हा बरोबरीची लोक समोर असतात. मी दिघेसाहेबांचा पुतण्या परंतु मी संघटन बळकट करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी माझ्यापद्धतीने पूर्ण प्रयत्न करेन,” असं म्हटलं आहे.