धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव जागृत मंचचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद देणार असल्याचा ईशारा दिला आहे.
जितेंद्र महाजन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे की, शहरात अनधिकृत बॅनर कोणीही लावू नये. लावल्यास मी स्वतः संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करेल. तसेच जे बॅनर बनवणारे आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा ही फिर्याद राहील. बॅनरमुळे कोणालाही इजा होणार नाही, याची काळजी बॅनर लावणाऱ्यांनी घ्यावी. नियमानुसार बॅनर लावल्यानंतर देखील त्यामुळे कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
बॅनर बनविणाऱ्यांना सुद्धा सूचना आणि बॅनर बनवताना नियमानुसार काळजी घ्यावी. अन्यथा बॅनर बनविणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही होत असते. सदर कार्यवाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार असेल, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. बॅनर बनवणाऱ्यांनी सुद्धा ! अन्यथा, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील.
परवानगी घेतली याचा अर्थ असा नाही ? की आपण कुठेही बॅनर लावू शकतो रस्त्यावर कुणालाही अडचण होणार नाही, अशा पद्धतीने बॅनर लावण्यात यावेत कोणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता बॅनर लावणार यांनी घ्यावी अन्यथा ते सुद्धा बेकायदेशीर राहील ही काळजी बॅनर लावणार यांनी घ्यावी, अन्यथा सर्वांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली जाईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे.
















