जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बिलाल चौकात रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जिंनतबी हुसेन शेख मणियार (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर निघताना जिंनतबी हुसेन यांना तुटून पडला विजेची तार दिसली नाही. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ जिंनतबी हुसेन यांना शासकीय वैदयकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर महिलेस मृत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा मेहरुणचे नगरसेवक सुनील महाजन यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.