नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीआय न्यायालयाने दिलेला हा निर्णय भारतातील एक काळा दिवस आहे. जादूने ही मशीद पडली का? जादूने टाळे उघडले गेले होते का? न्यायालयाच्या निकालाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बॉर्डने आव्हान द्यावे, असे आवाहन एमआयएमचे खासदार अससुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय बुधवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयानं दिला. बाबरी मशिद विध्वंस प्रकरणाच्या खटल्यात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सदर घटना पूर्वनियोजीत नव्हती, असं न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी म्हटले. बाबरी मशिद उद्धस्त केल्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला. लालकष्ण अडवाणी यांनी देशभरात रथयात्रा काढली. उमा भारती यांनी नारा दिला होता – एक धक्का और दो बाबरी मस्जिद तोड दो. बाबरी मशीद पडत असताना मिठाई वाटली जात होती. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे सर्वजण आनंद साजरा करत होते. विनय कटियार यांच्या घरात कट रचला गेला होता, असेही ओवैसी म्हणाले.